माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे.
त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.
Wednesday, 9 August 2017
घाई आणि तू
अघोरी घाईनं गाडी चालवून इच्छित स्थळी पोहोचल्यावर,
गाडी बंद करतांना नेमकं सुरेख गाणं लागावं
आणि मी पुढची सगळी कामं सोडून बसून राहावं, घाईला पार्किंग ब्रेक लाऊन
तसंच झालंय माझं,
No comments:
Post a Comment