तो/ ते
उगम आठवतोय का कुठं होता ते?
सोडले होते का काही पुरावे?
पुरावा, एखादा, कालातीत, जो शोधता येईल?
शोधल्यावर छापता येईल?
एखादी भली मोट्ठी शिळा?
एखादा हस्तिदंत?
सोडले होते का काही पुरावे?
पुरावा, एखादा, कालातीत, जो शोधता येईल?
शोधल्यावर छापता येईल?
एखादी भली मोट्ठी शिळा?
एखादा हस्तिदंत?
मी
नाही हो, स्वतःचं रक्तं सांडलं होतं
ध्येयपूर्तीशिवाय थांबणार नाही अशी शपथ घेतांना.
खरंय तुमचं, रक्त मातीत मिसळलं की त्याचा मागमूस उरत नाही.
हो हो वेडाच आहे मी.
हो पण एक झाड काय लावलं होतं उगमापाशी.
अं?.... खरंय, झाडं काय अशीही उगवतातच
अहो महत्व पोहोचण्याचं आहे
मग प्रवास किती केला ह्याचा पुरावा कशाला हवा?
काय? पुरावा नसेल तर माझी तत्त्वं, कविता, गाणी, शिल्पं आणि त्या मागचे विचार
सगळेच बेवारस होऊन जातील?
अहो .... एखादी चांगली व्यक्ती भेटली कि आपण आई बापाचं नाव नाही विचारत,
म्हणतो फक्त संस्कार चांगले केले आहेत हो! ..... अगदी तसंच
पुरावे नसले तरी ती सगळी तत्त्वं, कविता, गाणी आणि तत्सम सर्व
चांगल्या प्रतीचं असेल मागं उरेलच. नावा शिवाय सुद्धा. मग नावाचं काय?
अहो प्रवास महत्वाचा आणि त्या प्रवासाची मीमांसा, ती पण त्या प्रवाश्यासाठी
अहो नावाचं काय घेऊन बसलात? बसलाय कधी नदी काठी?
नदीच्या पात्रात कधी एखादं छानसं फूल वाहून येतं तर कधी बेढब, निस्तेज बेवारस प्रेतसुद्धा
पाहणारा निरिच्छ असला तर वाहून जाऊ देतो सगळं
अन एखादा ते फूल उचलून माळतो कोणाच्या केसात
प्रेताला अग्नी देतो, ढाळतो काही अश्रू अज्ञात दुःखासाठी
हि तत्त्वं, कविता, गाणी, शिल्पं आणि तत्सम सर्व असंच वाहत राहील कालौघात
कुठं नावाचं घेऊन बसलात आणि कुठं उगमाच्यापाशी ठेवलेल्या पुराव्याचं
प्रत्येक ठिकाणी ठेवायला शिळा घेऊन फिरलो तर किती ओझं होईल खांद्यावर
अहो प्रवास महत्वाचा आणि त्या प्रवासाची मीमांसा, ती पण त्या प्रवाश्यासाठी
काय? विषयांतर होतंय?
नाहीये, पुरावा नाहीये उगमा पाशी पुरलेला!
झाडाचं आता जंगल झालंय आणि रक्ताची फुलं.
चालतंय का बघा!
प्रमोद
२९ सप्टेंबर २०१६
ध्येयपूर्तीशिवाय थांबणार नाही अशी शपथ घेतांना.
खरंय तुमचं, रक्त मातीत मिसळलं की त्याचा मागमूस उरत नाही.
हो हो वेडाच आहे मी.
हो पण एक झाड काय लावलं होतं उगमापाशी.
अं?.... खरंय, झाडं काय अशीही उगवतातच
अहो महत्व पोहोचण्याचं आहे
मग प्रवास किती केला ह्याचा पुरावा कशाला हवा?
काय? पुरावा नसेल तर माझी तत्त्वं, कविता, गाणी, शिल्पं आणि त्या मागचे विचार
सगळेच बेवारस होऊन जातील?
अहो .... एखादी चांगली व्यक्ती भेटली कि आपण आई बापाचं नाव नाही विचारत,
म्हणतो फक्त संस्कार चांगले केले आहेत हो! ..... अगदी तसंच
पुरावे नसले तरी ती सगळी तत्त्वं, कविता, गाणी आणि तत्सम सर्व
चांगल्या प्रतीचं असेल मागं उरेलच. नावा शिवाय सुद्धा. मग नावाचं काय?
अहो प्रवास महत्वाचा आणि त्या प्रवासाची मीमांसा, ती पण त्या प्रवाश्यासाठी
अहो नावाचं काय घेऊन बसलात? बसलाय कधी नदी काठी?
नदीच्या पात्रात कधी एखादं छानसं फूल वाहून येतं तर कधी बेढब, निस्तेज बेवारस प्रेतसुद्धा
पाहणारा निरिच्छ असला तर वाहून जाऊ देतो सगळं
अन एखादा ते फूल उचलून माळतो कोणाच्या केसात
प्रेताला अग्नी देतो, ढाळतो काही अश्रू अज्ञात दुःखासाठी
हि तत्त्वं, कविता, गाणी, शिल्पं आणि तत्सम सर्व असंच वाहत राहील कालौघात
कुठं नावाचं घेऊन बसलात आणि कुठं उगमाच्यापाशी ठेवलेल्या पुराव्याचं
प्रत्येक ठिकाणी ठेवायला शिळा घेऊन फिरलो तर किती ओझं होईल खांद्यावर
अहो प्रवास महत्वाचा आणि त्या प्रवासाची मीमांसा, ती पण त्या प्रवाश्यासाठी
काय? विषयांतर होतंय?
नाहीये, पुरावा नाहीये उगमा पाशी पुरलेला!
झाडाचं आता जंगल झालंय आणि रक्ताची फुलं.
चालतंय का बघा!
प्रमोद
२९ सप्टेंबर २०१६
No comments:
Post a Comment