माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.
Saturday, 21 November 2020
स्मशानाच्या वाटेवर
ठाऊक नाही का
पण ती स्मशानाच्या वाटेवरच भेटायची
नेहमी
स्मशानाच्या वाटेवरच
उमलायची फुलं,
बागडायचे पक्षी,
वाकायचा आंबा.
स्मशानाच्या वाटेवरच
चमकायचे काजवे,
उतरायचा चंद्र,
वाहायचे वारे
स्मशानाची वाट
सांगायची बहुदा
आयुष्याचे पाश तोडायला
मरावं लागत नाही
जगावं लागतं
प्रमोद
20 नोव्हेंबर 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment